लखनऊ : युपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.

दरम्यान पावसाच्या तडाख्यामुळे तब्बल १३३ इमारती कोसळल्याने त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असून अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. १३३ इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे.

युपी’मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या