नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरू असून Locवर गोळीबार सुरूच आहे. मात्र भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेने, चर्चेने प्रश्न परिस्थिती बदलू शकते असे म्हटले परंतु तरीही आज पहाटेपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे.
एकीकडे भारताला चर्चेचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा प्रकार जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीत सकाळी ६ ते ७ असा सुमारे एक तास सुरू होता.
#JammuAndKashmir: Pakistan violated ceasefire at 6 am today in Krishna Ghati sector along the Line of Control in Poonch district. Indian Army retaliated effectively. Firing stopped around 7 am https://t.co/3VGaDZxHP5
— ANI (@ANI) February 28, 2019
