नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. भारताच्या या वीर जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत असून, महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यामुळे २ दिवस दुःखात बुडालेले गाव पार्थिव पोहोचताच अजून दुःखाच्या गडद छायेत जाणार हे निश्चित. त्यामुळे सर्वच कुटुंबियांचे आणि गावकऱ्यांना या वीरांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी डोळे आधीच पाणावले आहेत.

Pulavama crpf jawans attack martyrs leave their villages