19 April 2024 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये | कायदे रद्द करायला सांगितलंय सत्ता सोडायला नाही

Modi Govt, Rakesh Tikait, Farmers Protest

करनाल, १५ फेब्रुवारी: दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.

करनाल येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतला संबोधित करताना राकेश टिकैत बोलत होते. मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये. देशातील शेतकरी आणि जवानांनी केवळ कायदे रद्द करायला सांगितले आहे. सत्तेमधून बाहेर पडायला नाही, असा टोला टिकैत यांनी यावेळी बोलताना लगावला.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून केंद्र सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत, असा निर्धार टिकैत यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारविरोधात ४० नेत्यांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भाग प्रभावित होईल, असा दावा त्यांनी केला.

शेतकरी संघटनांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेला नाही. आम्ही कधीही चर्चा करायला तयार आहोत. आत्ता केंद्र सरकार शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करत आहे. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. केंद्र सरकार चर्चा करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. केंद्र आंदोलकांवर दबाव टाकण्याच्या मागे लागले आहे. असे असेल तर चर्चा कशी होणार? केंद्राने चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, मग चर्चा होईल असं संघटनांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Tikait has accused the central government of spreading hatred by inciting violence at the Red Fort in Delhi. “Until the agricultural laws are repealed, our demands are not met, the farmers will not sit idly by,” Tikait said. Forty leaders have supported us against the central government. The agriculture law will affect small farmers, small traders and rural areas, he claimed.

News English Title: Tikait has accused the central government of spreading hatred by inciting violence at the Red Fort in Delhi said Rakesh Tikait news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x