
Investment Tips | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. LIC चे पूर्ण भारतात करोडो ग्राहक आणि गुंतवणुकदार आहेत. LIC कंपनीबद्दल खास गोष्ट म्हणजे ती भारतातील विविध स्तरातील लोकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना जाहीर करत असते. जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल तर तुम्ही LIC च्या जीवन उमंग योजनेत बिनधास्त गुंतवणूक करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला LIC च्या या विशेष योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
100 वर्ष पॉलिसीचा लाभ :
जर तुम्ही LIC च्या जीवन उमंग योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 100 वर्षे वयापर्यंत लाभ मिळेल. जीवन उमंग पॉलिसीचे सर्वात खास वैशिष्ट हेच आहे की या पॉलिसी मध्ये योजना धारकांना वयाच्या 100 वर्षापर्यंत पॉलिसीचा लाभ दिला जातो. जर तुम्हाला छोटी रक्कम गुंतवणूक करून वार्षिक 36,000 हजार रुपये पेन्शन कमवायची असेल तर LIC जीवन उमंग योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
गुंतवणुकीवर उपलब्ध कर लाभ :
जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि नियमित आयकर भरत असाल तर तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिली जाईल. जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाईल. या पॉलिसीमध्ये तुम्ही 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही वयाच्या 100 वर्षांपर्यंत दर महिन्याला पेन्शन आणि जीवन विमा दोन्हीचे लाभ घेऊ शकता.
योजनेचे लाभ थोडक्यात :
जीवन उमंग योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. एकदा जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दरवर्षी निश्चित उत्पन्न मिळणे सुरू होते. हे उत्पन्न तुम्हाला वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत दिले जाईल. जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळातही निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही LIC च्या जीवन उमंग योजनेत बिनधास्त गुंतवणूक करू शकता. आणि वयाच्या 100 वर्षापर्यंत दर महिन्याला पेन्शन मिळवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.