
Money Investment | कोरोना महामारीने सर्वांनाच झोडपूण काढले. त्यामुळे नुकतेच नागरिक यातून स्वत:ला सावरत आहेत. अशा परिस्थितीवर मात करूण बाहेर पडलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित जिवणाचा शोध घेत आहे. बॅंकांमध्ये होणारे आर्थिक घोटाळे यासह अनेक बॅंका बूडीत देखील निघतात. त्यामुळे नागरिक पैशांच्या गुंतवणूकीत बॅंकेला डावलत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एलआयसीवर आजही गुंतवणूकदार विश्वास ठेवतात.
नागरिकांचा हाच विश्वास कायम ठेवत एलआयसीने आता आणखीन एक नविन योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला १० ते १५ वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळवण्यास मदत होते. तसेच येथे तुम्ही गुंतवलेला पैसा अगदी सुरक्षित राहण्याची खात्री आहे.
एकदाच प्रीमियम भरावा लागणार
या पॉलिसीचे खास वैशिष्ट्ये असे की, इथे तुम्हाला दर महा पैसे गुंतवण्याची काहीच आवश्यकता नाही. एकाच रक्कम भरुण त्यावर जबरदस्त परतावा मिळवता येतो. जर तुम्हाला प्रीमियम भरण्याचे टेंन्शन नको असेल तर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर या योजनेचा फायदा होतो.
दोन पॉलिसी टर्म निवडण्याची मुभा
या पॉलिसीची मुदत सामान्य माणसांना देखील परवडणारी आहे. यात १० किंवा १५ वर्षांची टर्म आहे. तुमच्या सोयीनुसार यातील दोन टर्म तुम्ही निवडू शकता. जर तुम्ही यात ८,३४,६४२ रुपये गुंतवले तर मूळ विमा रक्कम १० लाख रुपये जमा होते. तसेच मृत्यूवेळी नॉमिनीला ७९,८७,००० दिली जाते. तसेच या पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमच्या प्रीमियम रकमेवर गॅरेंटेड एडीशनचा फायदा होतो. जेव्हा तुम्ही या योजनेत प्रती एक हजार रुपये जमा करता तेव्हा त्यावर ७५ रुपयांची गॅरेटेंड फिक्स असते.
कर्ज घेण्याची सवलत
या योजनेत पॉलिसीचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला कर्ज देखील घेता येते. जर ३० वर्षांच्या व्यक्तीने एकदाच या पॉलिसीमध्ये ८,८६,७५० रुपये भरले तर एकूण खात्रीशीर विमा १० लाख होणार आणि ही रक्कम ११,०८,४३८ रुपये अशी मिळेल. जर १५ वर्षांची मॅच्युरीटी निवडली तर २१ लाख २५ हजार रुपये, पहिल्याच वर्षी गुंतवणूकदाराचे निधन झाले तर ११ लाख ३८ हजार ४३८ रुपये मिळतील. तसेच या कालावधीत १५ व्या वर्षी मृत्यू झाल्यास २२ लाख ३३ हजार ४३८ रुपये मिळतील. या पॉलिसीत तुम्ही ५० हजारांचा प्रिमीयम निवडला असेल तर ५ लाखांच्या विम्याचा लाभ तुम्हाला मिळतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.