
Ration Card | देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कुही तालुक्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडून रेशन कार्ड अपडेटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्व सदस्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. नागरिकांनी असे केले नाही तर, त्यांना येणाऱ्या काळात धान्य मिळणार नाही.
नजीकच्या दुकानात करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण :
तुम्हाला देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर, नजिकच्या रास्त भाव दुकानात आधार कार्ड सोबत घेऊन ही प्रक्रिया पार पाडायची आहे. रेशन कार्ड अपडेट बाबतचे हे आवाहन कुही तालुक्याच्या तहसीलदारांनी केले आहे असे पुरवठा निरीक्षक रेणुका वझलवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य :
महाराष्ट्र शासन अन्नधान्य वितरणप्रणाली अंतर्गत रेशन कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. रेशन कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक सदस्याने आपल्या गावाजवळील किंवा शहराजवळील रास्त भाव धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध असलेल्या ई-पॉस डिजिटल मशिनीद्वारे आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचा आहे.
प्रक्रिया पूर्ण करण्यास कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही :
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या प्रक्रियेसाठी रेशन कार्ड वापरणाऱ्या सदस्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. आता केलेल्या प्रक्रियेचा फायदा रेशन कार्ड धारकांना येत्या काळात होणार आहे. ज्या व्यक्तींना येत्या काळात रेशन कार्डवर अन्नधान्याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आता या चालू फेब्रुवारी महिन्यातच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा येत्या काळात तुम्हाला धान्य मिळणे बंद होईल. याबाबतची संपूर्ण माहिती रेणुका वझलवार यांनी दिली आहे.
महत्त्वाचं :
पुरवठा निरीक्षक रेणुका वझलवार यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मध्यमंकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे कुही तालुक्यातील रहिवाशी कामानिमित्त बाहेर गेला असेल तर त्याला तिथून देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.