रत्नागिरी : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी सुमारे २,५०० कामगारांना देशोधडीला लावले असा आरोप स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार डॉक्टर तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. खंबाटा बंद झाल्याने त्या रोजगारावर अवलंबून असलेले तब्बल ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे.
ही कंपनी २०१६ साली बंद झाली त्या मागील खरे सूत्रधार विनायक राऊत आहेत, असा आरोप यापूर्वीच खंबाटातील कामगारांनी केला होता. आज दुपारी २ वाजता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांबरोबर रत्नागिरीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेणार असून, नेमके काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंजली दमानिया यांच्या रत्नागिरीत येण्यामुळे शिवसेनेनेत खळबळ उडाली असून बदनामीमुळे शिवसेना घाबरली आहे.
