जळगाव, १० ऑगस्ट | सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का देताना तब्बल २७ नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.

भाजपातून बाहेर पडलेल्या २७ नगरसेवकांना पैकी अनेकांना शिवसेनेत जाऊन पश्चाताप होत आहे. ते कोणत्या भूलथापांना बळी पडले हे त्यांनाच माहिती आहे. येणाऱ्या काळात काय ते समोर येईलच, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिली.

विविध प्रश्नांवर माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी संवाद साधला. पत्रकार परिषदेला जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आ.सुरेश भोळे, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ.स्मिता वाघ, समाज कल्याण सभापती जयपाल बोदरडे, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, पद्माकर महाजन, नंदू महाजन आदी उपस्थित आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

New Title: BJP MLA Girish Mahajan talked on corporators join in Shivsena party news updates.

‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल – गिरीश महाजन