2 May 2025 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेनेशी चर्चा होत नसल्याने भाजप'मधील दिग्गजांची तोंडं बंद?

Shivsena, BJP Maharashtra

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी लोटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील वाद अद्यापही सुटला नाही. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यात सहज सरकार स्थापन करता येईल, असे गृहित धरलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व सत्तेतील समान वाटा या मागण्यांसाठी अडून बसलेल्या शिवसेनेने चर्चेचे दरवाजेच बंद केल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही भारतीय जनता पक्षाच जात्यात आला आहे. त्यातच युतीचे सरकार स्थापन झाले तरी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, अर्थ अशी महत्त्वाची खाती शिवसेनेला द्यावी लागणार असल्याने भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते नाराजीचा सूर काढत आहेत.

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले नाही, तरी इतर काही महत्त्वाची खाती मात्र भारतीय जनता पक्षाला सोडावीच लागणार आहेत. नगरविकास आणि गृह हे विभाग मुख्यमंत्र्यांकडे राहतील. महसूल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आदी खाती शिवसेनेकडे गेली, तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांना कमी दर्जाच्या खात्यांवर समाधान मानावे लागेल, असा सूर भारतीय जनता पक्षामध्ये निघत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या