मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजून एक संतापजनक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘लावारीस’ म्हणून केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर ‘चौकीदार अवधूत वाघ’ या अकाऊंटवरुन सक्रीय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची चेष्टा केली. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…’, असं संतापजनक उत्तर वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…
हागणारा नाही तर बघणारा लाजातो https://t.co/XHOP9TIp9A— चौकीदार Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) March 28, 2019
