कोल्हापूर, २६ जुलै | मागील आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस आणि शुक्रवारी झालेली अतिवृष्टी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासणोली धरणासह तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या्प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशाच परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बहुचर्चित असलेल्या वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांडव्यातील या पाण्यामुळे जवळपास 45 फूट खोल आणि शंभर फूट लांबीपर्यंत माती खंगाळून गेली आहे. परंतु, सांडव्याला पडलेल्या या भगदाडामुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Canal of Vansoli Dam in Bhudargad Kolhapur district is damaged due to heavy rain effect news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

कोल्हापुरातील वासणोली धरणाच्या सांडव्याला भगदाड | परिसरातील गावांना धोका