30 May 2023 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

पंढरपूर | जनतेसाठी एक संधी आहे, लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा - फडणवीस

Devendra Fadnavis, Pandharpur Mangalvedha

पंढरपूर, १२ एप्रिल: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढला असला तरी निवडणूकींचा धुरळा जोरदार उडत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली असून भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ आवडाडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत धमुाकूळच घातला. त्यातही काल (११ एप्रिल) जयंत पाटील यांनी भर पावसात घेतलेली सभा तर जास्तच गाजली. त्यांच्या याच सभेवरुन भाजप नेते आता राष्ट्रवादीला लक्ष करत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी सरकार काम करतंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असलं तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारनं मदत केलीच नाही पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केली.

दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी देखील राष्ट्रवादीवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा कणखर शब्दांत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते तेव्हा त्यांनी ही टीका केली आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis targeted the ruling party during the election campaign rally. Fadnavis said the Pandharpur by-election is an opportunity for the people. Vote against an anti-people government. This is not a Mahavikas Aghadi government but a Mahavasuli government.

News English Title: Devendra Fadnavis attacked on NCP party during campaign of Pandharpur Mangalvedha by poll election news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x