मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
पुढे अशोक चव्हाण म्हणाले, “राज्यातील मतदान प्रक्रिया झाली आहे. परंतु, मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशिन टेम्परिंग होऊ शकते. त्यामुळे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात मोबाईल जॅमर लावावा. यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले आहे.
याआधी देखील ईव्हीएम हॅक करता येतात अशी शंका विरोधकांनी व्यक्त केली होती. मात्र विरोधकांच्या प्रश्नांवर कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. तसेच मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड होत असल्याची वृत्त येत आहेत.
