25 April 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

दुष्काळी उपाययोजनांसाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहीता शिथिल

Maharashtra, Devendra Fadanvis, Raj Thackeray, Sharad Pawar, Loksabha Election 2019

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. सदर मागणी निवडणूक आयोगाने विषयाचे गांभीर्य लक्षात मान्य केली आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील आचारसंहीता शिथील करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहिर केले.

राज्यात कडक उन्हाच्या झळा बसत असून, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनलची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. महाराष्ट्र सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठकसुद्धा घेण्याची नितांत गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या लेखी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x