जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
मुंबई : महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिर्डी मधील भाषणादरम्यान मोदींनी उल्लेख केला होता की, जलयुक्त शिवार योजनेमुळे १६,००० गावांना पाणी मिळाले. पण, पंतप्रधानांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे असा आरोप पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना आणली. परंतु, ताशा प्रकारची कामे झाली असल्याचे काहीच दिसत नाही. जर असं असेल तर मग या योजनेचे ७,५०० कोटी रुपये गेले कुठे, असा थेट प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्ष पणे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र होरपळून निघण्याची चिन्ह आहेत. राज्यात याआधी १९७२ दुष्काळाची भयंकर स्थिती ओढवली होती. परंतु सध्या त्यापेक्षा सुद्धा भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु, राज्य सरकार अजूनही अधिकृत पणे दुष्काळ घोषित करत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ३३ टक्के वीजबील माफ केल्याचे राज्य सरकार सांगते. परंतु, महावितरण आज सुद्धा वीजबीलं पाठवतच आहे. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.
राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks , विरोधी पक्षनेते @dhananjay_munde व प्रमुख प्रवक्ते @nawabmalikncp यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रवक्ते @Clyde_Crasto उपस्थित होते.#PressConference pic.twitter.com/VChzIF0N6U
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. १९७२ हूनही भयंकर दुष्काळ परिस्थिती आज निर्माण झाली आहे, मात्र सरकार दुष्काळ घोषित करत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आ. @AjitPawarSpeaks यांनी यावेळी केली. #PressConference pic.twitter.com/t8xL4BH205
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेसोळा हजार गावांना पाणी मिळाले. हा दावा खोटा आहे. सरकारने गाजावाजा करत ही योजना आणली. मात्र कामे झाली असल्याचे दिसत नाही. मग साडे सात हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न आ. @AjitPawarSpeaks यांनी उपस्थित केला. pic.twitter.com/SZ2CrPdIJ0
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
३३ टक्के वीजबिल माफ असे सरकार म्हणते मात्र #महावितरण अजूनही बीलं पाठवतच आहे. कोळशाबाबत समन्वय साधावा तर सरकार म्हणतंय की कोळसा नाही. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी आ. @AjitPawarSpeaks यांनी केली. pic.twitter.com/iHzpV0Boei
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
कर्जमाफीला १४ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला मात्र अजूनही यादी फायनल नाही. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आम्हाला या विषयात राजकारण आणायचे नाही, सरकारला आम्ही मदत करायला तयार आहोत. परंतु शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असे आ. @AjitPawarSpeaks यांनी स्पष्ट केले. pic.twitter.com/goNeAgn1yU
— NCP (@NCPspeaks) October 25, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या