महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
19 दिवसांपूर्वी -
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु | ते २२४ गुजराती-मारवाडी रडारवर
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे. या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचं आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात - मुख्यमंत्री
राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपली. यात मनसुख हिरेन प्रकरण प्रचंड गाजले. यात क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वाझे हे नाव प्रकर्षाने समोर आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याच दरम्यान त्यांनी कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पुढे आल्याने त्यावर देखील भाष्य केलं आहे.
1 महिन्यांपूर्वी -
कोकणातील चाकरमान्यांसाठी | गावी जाणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट करावी लागणार
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने जिल्हा [प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी कोकणच्या दौऱ्याला मुकलेला कोकणी माणूस पुन्हा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणी लोकांना प्रिय असलेला शिमग्याच्या उत्सव यावर्षी देखील येणार नाही अशी शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
1 महिन्यांपूर्वी -
अनिल शिदोरे RRPCL कंपनीच्या सीईओंना भेटल्यानंतर....रामचंद्र भाडेकरांचा गंभीर आरोप
नाणार प्रकल्पाला विरोध करुनही राजकीय फायदा न मिळाल्यामुळे आता ‘इतर फायदे’ पदरात पाडून घेण्यासाठी मनसेने आपली भूमिका बदलल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेने केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार अविनाश सौंदळकर यांना 2014 पेक्षा कमी मते पडली,पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त 14 गावातून तीन आकडीही मते मिळाली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तर मनसे नावालाही नव्हती.
1 महिन्यांपूर्वी -
नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे आणि मात्र तो पूर्वीच्या भूमिकेशी सांगड घालणारा नसला तरी राज्याचा हिताचा असल्याचं म्हटलं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने बासनात गुंडाळलेला नाणार प्रकल्प पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
नाणार प्रकल्प प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला परवडणार नाही - राज ठाकरे
कोरोनोच्या आपत्तीनंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी.’ असे मागणी करणारे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
मराठवाडा-विदर्भात अजित पवारांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.
2 महिन्यांपूर्वी -
आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलंय - निलेश राणे
शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. 2024 खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलं आहे असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भाजप सोबत होती म्हणून 56 आले असेही ते म्हणाले.
2 महिन्यांपूर्वी -
शिवसेना आ. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसमध्ये
शिवसेनेतील पक्षांतर्गत वादाला कंटाळलेले उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या जाण्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
2 महिन्यांपूर्वी -
5 वर्ष नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळलो म्हणून शिवसेनेत प्रवेश | 7 नगसेवकांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
VIDEO | मातोश्रीवरचा चप्पलचोर | भाषा बदल नाहीतर जिथे दिसाल तिथे फटकावीन - निलेश राणे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली.
2 महिन्यांपूर्वी -
कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागणार आहे | अरविंद सावंत यांची टीका
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असं देखील भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले होते.
2 महिन्यांपूर्वी -
राणेंनी उद्घाटनाला पहिल्यांदा पावरफुल 'डेअरिंगबाज' माणसाला बोलावलं होतं | सोशल व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असंही भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते.
2 महिन्यांपूर्वी -
नारायण राणेंना कसं साभाळावं आणि सन्मान करावा, ते भाजपला माहिती - अमित शहा
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले
2 महिन्यांपूर्वी -
जिल्हा नियोजन बैठक | नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये शाब्दिक बाचाबाची
शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. कोकणातील राजकारणाचा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली.
3 महिन्यांपूर्वी -
मी होतो म्हणून शिवसेनेची कोकणात ताकद होती - नारायण राणे
कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
3 महिन्यांपूर्वी -
सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या |आमदार नितेश राणेंची माहिती
कणकवलीत निकाल जाहीर होताच राणेंना धक्का असल्याच्या बातम्या चालू लागल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केलाय. नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, ७० पैकी ५५ ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
शिवसेनेचा राणेंना धक्का | कणकवलीतील ३ पैकी दोन ग्रामपंचायतींवर भगवा
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली होती - विनायक राऊत
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भारतीय जनता पक्षाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” असा दावाही त्यांनी राऊत यांनी केला आहे. राज्याच्या राजकारणात विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सूरू होण्याची शक्यता आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय