महत्वाच्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला सुनावणी, तर शिंदे गट 2 दिवस आधी गुवाहाटीला, राजकीय भूकंपाचे संकेत? मोठी बातमी
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ashok Mochi | अशोक मोची! गुजरात दंगलीत गाजलेला चेहरा, मोदींच्या फेक गुजरात मॉडेलची पोलखोल करतोय, पहा व्हिडिओ
Ashok Mochi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसेलही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आक्रमणामुळे अचानक काँग्रेसच्या या पदयात्रेला राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारयुद्धात मोठा मुद्दा वाटू लागला आहे. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या निवडणूक सभांमध्ये पदयात्रेला लक्ष्य केले, त्यानंतर काँग्रेसला त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेबाबत केलेल्या वक्तव्यांना त्यांच्या ‘निराशेचा’ परिणाम म्हणून संबोधत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेवर केलेल्या राजकीय हल्ल्यांना खुद्द राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक सभांमध्ये कोणतेही थेट उत्तर दिले नाही.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Jodo Yatra | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गुजरातला न जाता निवडणुकीचा मुद्दा बनली, जोरदार शाब्दिक युद्ध
Bharat Jodo Yatra | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसेलही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आक्रमणामुळे अचानक काँग्रेसच्या या पदयात्रेला राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारयुद्धात मोठा मुद्दा वाटू लागला आहे. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या निवडणूक सभांमध्ये पदयात्रेला लक्ष्य केले, त्यानंतर काँग्रेसला त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेबाबत केलेल्या वक्तव्यांना त्यांच्या ‘निराशेचा’ परिणाम म्हणून संबोधत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेवर केलेल्या राजकीय हल्ल्यांना खुद्द राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक सभांमध्ये कोणतेही थेट उत्तर दिले नाही.
2 वर्षांपूर्वी -
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवछत्रपतींना माफीवीर म्हटलं तरी राज्य भाजप शांत, तर सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेचा डिजिटल निषेध
Chhatrapati Shivaji Maharaj | वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.
2 वर्षांपूर्वी -
भारतीयांनो! महागाई किंवा बेरोजगारी नव्हे, आता पंतप्रधान मोदी निवडणुक प्रचारात चक्क इंटरनेट मोबाईल डेटावर मतं मागत आहेत
Vote For Mobile Data | गुजरात निवडणुका जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्ष प्रभावशाली पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने १८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ४५ पाटीदारांना उमेदवारी दिली आहे, तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ४२ पाटीदार उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षानेही (आप) समाजातील ४६ नेत्यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ताचा वृत्त वाहिनीवर संतापजनक दावा
Veer Savarkar Letter to British | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटला असताना आता त्यापुढचा अंक भाजपने सुरु केला आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी सध्याचे आदर्श, राज्यपालांचं संतापजनक विधान
Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. विविध घटकातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण, ते सावरकरांबाबतच सत्य असंही म्हटलं
Veer Sarvarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shraddha Walkar Murder | शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार होतात, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून समस्त सुशिक्षित मुलींचा अपमान
Shraddha Walkar Murder Case | केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पंतप्रधान मोदींसमोर अवस्था बघा, लपून खाण्याची वेळ
Video Viral | तुम्ही कधी पाहिलं आहे का, की कार्यक्रमा दरम्यान कोणीतरी हळूच तोंडामध्ये खाण्यासाठी काही तरी टाकले आहे. घरातील कार्यक्रमामध्ये या सर्व गोष्टी ठिक आहेत मात्र आपल्या शेजारी देशाचे पंतप्रधानन बसल्या नंतर आपण या गोष्टींचा विचार तरी करू शकतो का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाकाल लोकांच्या उद्घाटनासाठी मध्य प्रदेश मध्ये पोहोचले होते आणि यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. सभेदरम्यान, पीएम मोदी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत मंचावर बसले होते मात्र यादरम्यान शिवराज यांनी असे काही केले की पीएम मोदींनी लगेचच शिवराज यांच्याकडे पाठ फिरवली. तसेच मोदी आणि शिवराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक या व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
पैठणमध्ये शिंदेंच्या सभेला गर्दी भासविण्यासाठी अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना हजर राहण्याच्या सूचना
CM Eknath Shinde | पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्र्यांच्या उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुक्ता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिल्याने शिंदे गटाला विचार पडला होता. विशेष म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या घरी बारशाच्या कार्यक्रमालाही अधिक लोकं जमतात आणि तेवढीही गर्दी मंत्रिपद मिळ्यानंतरही मंत्री महोदयांना जमवता आलेली नाही. त्यानंतर औरंगाबाद येथील आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची पुन्हा चर्चा रंगली होती.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | राणा दाम्पत्याकडून हिंदू धर्माच्या प्रथांचा भयंकर अपमान, विसर्जनावेळी दोघांनी गणपती बाप्पाची मूर्ती वरून पाण्यात फेकली
MP Navneet Rana | गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. काल 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाचे विसर्जन देखील हिंदू धर्मातील प्रथेनुसार कसं करावं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या चुलतभावासोबत गृहमंत्री फडणवीस यांचे संबंध?, तर राज्यपालांसोबतही स्वागत सत्काराचे फोटो
Yakub Memon Kabar | दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोर बडा कब्रीस्तान स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला दफन करण्यात आले. याकूब मेमनची कबर सजवण्यात आली आहे. कबर सजवण्यासा परवानगी कुणी दिली यावरुन आता चांगलाच वाद पेटला आहे.
2 वर्षांपूर्वी -
हा शिंदे-फडणवीस सरकारचा विकास? | मुख्यमंत्री शिंदेंना सोलापूर-धुळे महामार्गावरून वळसा घालावा लागू नये म्हणून डिव्हायडर तोडला
CM Eknath Shinde | औरंगाबाद जिल्ह्यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यासह रमेश बोरणारे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल अशा पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर मतदारसंघात दाखल झाल्यावर या पाचही आमदारांचे जंगी स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या पाचही बंडखोरांच्या मतदारसंघात रॅली काढत, सभा घेत गर्दी खेचली होती. मात्र एकनाथ शिंदे सभा घेताना अधिक मंत्री असलेले आणि सोयीचे मतदारसंघ निवडत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. महराष्ट्राच्या राजकरणात सभांमधून झंझावात निर्माण होईल असं एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व अजिबात नाही. त्यामुळेच ते सोयीचे मतदारसंघ निवडून एक सेफ गेम खेळत असल्याचं पत्रकार आपसात बोलत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद, बिथरलेल्या भाजपचं महागाई-बेरोजगारीपेक्षा गंभीर मुद्दावर ट्विट, राहुल गांधींचं टी-शर्ट किती रुपयांचं?
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे ते आता सर्व भारतभर यात्रा घेऊन पोहोचणार असल्याने काँगेसमध्ये जोश आल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या यात्रेत राहुल गांधी यांनी सामान्य लोकांशी संबंधित महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर भर दिला असून त्यात ते सर्वत्र पत्रकार परिषद आणि थेट लोकांना संबोधित करत आहेत. परिणामी भाजपाला नेमकं काय करावं हे उमगतं नसल्याने त्यांनी राहुल गांधीच्या टीशर्टचा मुद्दा आणि त्याची किंमत यावरून ट्विट केल्याने भाजपाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. तुमच्यासाठी हाच राष्ट्रीय मुद्दा उरला आहे का? आणि दुसऱ्यांच्या कपड्यांवर लक्ष देण्यापेक्षा देशातील बेरोजगारी आणि महागाईवर लक्ष द्या असं अनेकांनी भाजपाला सुनावलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत एकत्र येणार, भाजपचे धाबे दणाणले, बैठकांचा सपाटा
Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, मात्र भाजपच्या राजकीय विरोधकांनी कंबर कसली आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीला भेट देऊन विरोधी पक्षनेत्यांना एकत्र आणण्याबाबत बोलत आहेत, तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘खेला होबे’ असं म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
अमित शहा मुंबईत बैठक घेऊन गेले, त्यानंतर महागाई, बेरोजगारीचे मुद्दे सोडून भाजपचे नेते याकूब मेमनच्या कबरीच्या मुद्द्यावर केंद्रित
Yakub Memon | याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.
2 वर्षांपूर्वी -
लालबागचा राजाच नव्हे तर आता मतदारही सोमैयांच्या आरोपानंतर हसतात, बीएमसी निवडणुकीपूर्वी सोमैयांकडून नवे आरोप
Kirit Somaiya | काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “नोएडातील भ्रष्टाचाराचे ट्विन टॉवर पाडले. आता महाराष्ट्रातील अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचे स्मारक असलेला त्यांचा रिसॉर्ट पाडण्याची शक्ती बाप्पाने द्यावी अशी प्रार्थना केली. मुंबई महानगरपालिकेतील माफिया सरकार जावे यासाठीही बाप्पाकडे प्रार्थना केली आणि बाप्पाही माझ्याकडे बघून हसले.
2 वर्षांपूर्वी -
दिल्लीत नितीश कुमार आणि शरद पवार कार्यरत होताच, राज्य भाजप नेत्यांची बारामतीत हेडलाईन मॅनेजमेंटसाठी केविलवाणी राजकीय धडपड
Loksabha Election 2022 | जनता दल युनायटेडच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर दुसऱ्याच दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मोहिमेवर सोमवारी पाटणाहून दिल्लीला रवाना झाले. जदयूने त्यांना देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे अधिकार दिले आहेत. दिल्ली विमानतळावर त्यांनी माध्यमांना सांगितले की, मला पंतप्रधान होण्याची कोणतीही आकांक्षा नाही. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘आज देशात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
जसे अलीबाबा के ४० चोर होते, तसे शिंदे बाबा के ४० चोर ओळखले जातील | शिंदे गटातील मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचं बिंग फोडण्यास सुरुवात
Minister Gulabrao Patil | देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राइससह गुंतवणूकीचा सल्ला
-
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
-
Salary Structure Alert | नवीन नोकरीत रुजू होणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा नुकसान निश्चित आहे
-
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
-
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
ITR Filing Claim | टॅक्सपेअर पगारदार HRA आणि गृह कर्जावरील व्याजावर एकत्र क्लेम करू शकतात? पैसा वाचवा
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
-
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढ होणार, आकडेवारीबद्दल अपडेट आली