नागपूर : महाराष्ट्रातसुद्धा सूर्य आग ओकत आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर पोहोचला असून धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमान चांगले वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील पारा ४६ अंशांच्या पुढे पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

दुपारच्या वेळेत वाढत्या तापमानाने शहरी भागात रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरातील तापमान ४१ अंशांवर पोहोचले होते. मुंबईतील सांताक्रुझमधील तापमानाचा पारा ४३.३ अंशांवर आला होता. तर कुलाबाचे तापमान ३४ अंशांवर पोहचले होते.

राज्यात उष्णतेची लाट; सलग मेपर्यंत कायम राहणार