औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एमआयएम’चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे थेट तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सध्या प्राथमिक फेरीत चित्र.
दरम्यान असे असले तरी चंद्रकांत खैरे यांची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. मात्र औरंगाबादचे विद्यमान आमदार आणि एमआयएम’चे नेते इम्तियाझ जलील मोठ्या फरकाने पुढे असल्याचं चित्र आहे.
