28 March 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या

MP Navneet Rana Kaur, CM Uddhav Thackeray, Matoshri

अमरावती, ४ नोव्हेंबर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० मदत देण्याची घोषणा जाहीर केली होती. यावर राणा म्हणाल्या की, ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे नुकसान होऊन ते पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी आणि लाल्या रोग आला आहे. त्यामुळे कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत ताबडतोब जाहीर करावी. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी ५०,००० रुपये जमा करावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर दिवाळी साजरी करू दिली जाणार नाही असा थेट इशाराच नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०,००० करोडचे आर्थिक पॅकेज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५,००० रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

 

News English Summary: Farmers in Maharashtra have been hit hard by floods and heavy rains. The Thackeray government has announced a grant of Rs 10,000 crore for farmers. The Chief Minister also announced to distribute this aid to the farmers as soon as possible. However, this aid is very meager for the farmers and a large number of farmers have not yet got their panchnama, said Amravati MP Navneet Rana.

News English Title: MP Navneet Rana Kaur criticized CM Uddhav Thackeray over farmers issues News Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x