कोल्हापूर : सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीच्या प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले असताना आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. शैलजा पाटील, मागील ४ दिवसापासून स्वतः पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पोटापाण्याचं पाहण्यासाठी आपल्या सहकारी महिलांसोबत जेवण तयार करून, सांगलीतील पूरग्रस्त गावांमध्ये जेवणाचे पाकीट वाटत होण्याची योग्य काळजी घेत आहेत. दरम्यान सांगलीतील विविध पूरग्रस्त गावातील प्रतिदिन जवळपास ५ हजार लोकांना ते जेवणाचे पाकीट स्वयंसेवकामार्फत पोहोचविण्याची जवाबदारी पार पाडत आहे आणि ते कौतुकास्पद आहे. त्यांनी मागील ४ दिवसापासून त्यांचा हा रोजचा दिनक्रम पाळला आहे. सागंलीकरांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी दिलेल्या प्रेमापोटी जयंत पाटील यांचे संपूर्ण कुटुंब सांगलीकरांच्या मदतीला मैदानात उतरले आहेत.

सांगली: जयंत पाटील प्रत्यक्ष मदतीसाठी मैदानात; तर त्यांच्या पत्नी पुरग्रस्तांच्या जेवणाची काळजी घेत आहेत