महत्वाच्या बातम्या
-
समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? | मनसेचा सवाल
मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये राष्ट्रवादीला नंबर वन करणार | राष्ट्रवादी संवाद यात्रेत खडसेंची गर्जना
राज्यात संवादाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुचना याव्यात आणि त्यातून राष्ट्रवादीच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी संपूर्ण राज्यातील संघटना बळकट करत आहे. तसेच संघटना आणि पक्ष यांच्यातील संवाद वाढावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रत्येक तालुका-जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा निर्माण करून राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान सध्या जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जळगावात आहे.
4 वर्षांपूर्वी -
5 वर्ष नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळलो म्हणून शिवसेनेत प्रवेश | 7 नगसेवकांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जुमलाजीवी, दंगलजीवी, रक्तजीवी, अदानीजीवी, अंबानीजीवी, फेकुजीवी, थापाजीवी आणि...
मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो असं मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मातोश्रीवरचा चप्पलचोर | भाषा बदल नाहीतर जिथे दिसाल तिथे फटकावीन - निलेश राणे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
आधी रुग्णालय आणि नंतर संसद भवन उभे करावे - खा. अमोल कोल्हे
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या संसद भवनाच्या उभारणीवरुन राष्ट्रपतींना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी आधी देशाची प्राथमिक गरज लक्षात घेत सुसज्ज रुग्णालय उभारावे आणि नंतर नव्या संसद भवनाची उभारणी करण्याचे आत्मचितंन करावे असा सल्लाही दिला आहे. अमोल कोल्हे यांनी फेसबूक पोस्ट करत देखील याची माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का | बडे नेते विनोद हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागणार आहे | अरविंद सावंत यांची टीका
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असं देखील भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाने मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत - रोहित पवार
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील क्रीडा आणि कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पुढील चौकशी आपल्या हिंदू देवतांची आणि त्यांच्या भक्तांची? | बँकर मॅडमचं धार्मिक ट्विट
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार | गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राणेंनी उद्घाटनाला पहिल्यांदा पावरफुल 'डेअरिंगबाज' माणसाला बोलावलं होतं | सोशल व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असंही भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवली | मनसे अध्यक्षांकडून पक्ष बांधणी | तिघांची प्रभारी म्हणून नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला आता सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी यांनी वैयक्तिक चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गळती रोखण्यासाठी माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती | अमित शहांचा संताप
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंना कसं साभाळावं आणि सन्मान करावा, ते भाजपला माहिती - अमित शहा
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद | पवारांकडून राणेंची खिल्ली
अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार नारायण राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिश्किल शैलीत समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
जनतेचे खिसे कसे कापतो | हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्राची ही चाल....
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. पेट्रोल नव्वदीपार गेलं असून, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती करण्यासाठी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लिहिली आहे. रोहित पवार यांनी केंद्र सरकार चलाखी करत असल्याचा आरोप करताना राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’ असा टोला लगावला आहे. रोहित पवारांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहिरातीचाही फोटो शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीकडून लोटसचं ऑपरेशन सुरु असल्याने भाजप नेत्यांकडून पुन्हा पुड्या - सविस्तर वृत्त
आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? - राज ठाकरे
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा | नंतर कळलं की अदानी पवारांच्या घरी येऊन गेले
त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. “वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH