महत्वाच्या बातम्या
-
खडसेंवर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला | त्यांनी शिवसेनेत यावं - अब्दुल सत्तार
भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात येण्याची खुली ऑफर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना सत्तार यांनी खडसेंना बाहुबलीची उपमा दिली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता | त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे - उपमुख्यमंत्री
राज्यातील काही भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे. परंतू, येत्या काही काळात राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याती नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता भासल्यास कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे, असे अवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं | पुणेकरांनी नियमांचं पालन करावं - प्रकाश जावडेकर
पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसंच पुण्यातील कोरोना संदर्भात 3 बैठका झाल्या असून यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे-पाटील तसंच संबंधित अनेक अधिकारी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
Vastu Shastra | जीवनात सकारात्मक बदल | घराच्या मुख्य दरवाजा वर करा हे बदल
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते.
5 वर्षांपूर्वी -
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा | घरी बसून परीक्षा देण्यास मंजुरी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात आता विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता कायम असतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (गुरुवार, 3 सप्टेंबर 2020) महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचा अहवाल प्राप्त होताच त्यावर विचार केला जाईल. आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी शासन, प्रशासन सावध भुमिका घेताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | २९२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज आणखी १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस - शरद पवार सुद्धा राज्यभर फिरत आहेत | मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा प्रचारात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन जनतेला आवडलं की नाही - एकनाथ खडसे
भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात एकाकी पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारी समितीमध्ये देखील त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मागील काही काळात त्यांना भाजपच्या राज्यांसंबंधित निर्णयात सामील देखील करून घेतलं जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रात जस मोदी आणि अमित शहा यांचा आवाज चालतो, तसा राज्यात फडणवीस यांचा आवाज चालतो असं भाजपच्या अंतर्गत गोटात देखील छुप्या आवाजात मान्य केलं जातं.
5 वर्षांपूर्वी -
राज्य पोलिस दलात १५,५९१ कोरोना बाधित | आजपर्यंत १५८ पोलिसांचा मृत्यू
देशात करोनाचा शिरकाव सर्वात आधी केरळमध्ये झाला. केरळमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सुरूवातीच्या काही दिवसांनंतर राज्यात करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत गेली. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत ६६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील २५ हजाराच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बदल्या करणं हा एकमेव धंदा राज्य सरकार करतंय | फडणवीसांचा आरोप
राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अजून नियंत्रणात आलेलं नाही. दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना रुग्णांची वाढीचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात होणारी वाढ कायम असताना तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईतील चाचण्या वाढवा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर | वेळीच प्राथमिक सुविधा न मिळाल्याने पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू
कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | राज्यात पुढचे ३ महिने धोक्याचे | सरकारकडून महत्त्वाचा निर्णय
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद शिवसेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश
कोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी औरंगाबादेत शिवसेना दे-धक्का दिला आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ई-पासची अट रद्द | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त
राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार | घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितीली आहे. तसेच, विद्यापीठांनी आपले म्हणने राज्य सरकारला कळविण्यापूर्वी विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उदय सामंत यांनी आज (31 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस संसर्ग, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारांनी असमर्थता दाखवली होती.
5 वर्षांपूर्वी -
सकाळी लवकर उठा आणि बाजारात फिरा | तेथे कोणतं फिजिकल डिस्टंसिंग पाळलं जातं
प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. ८ दिवसात मंदिर उघडण्याबाबत नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं आश्वासन मिळालं आहे. पण १० दिवसात मंदिर उघडी नाही झाली तर पुन्हा पंढरपुरात येऊ अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे - संजय राऊत
प्रकाश आंबेडकरांचं मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, मंदिर बंद ठेवणं हे कोणी आनंदाने करत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार हे टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघड्या करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिराचा विषय, रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा आहे. पण विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील.’
5 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीचं पंढरपुरात मंदिरं खुली करण्यासाठी शांततेत आंदोलन
मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची उच्चांकी आकडेवारी | तब्बल 16,867 नवे कोरोना रुग्ण
लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने राज्यांना अटी घालून दिलेल्या असतानाच राज्यातून कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल १६ हजार ८६७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL