
7-12 Utara | अनेक व्यक्ती आपल्या स्वखर्चाने जमिनी विकत घेतात आणि आपली संपत्ती वाढवतात. तर काहींना आपल्या आजोबा आणि वडीलांकडून वडिलोपार्जित जमिन मिळालेली असते. अशात जेव्हा संपत्तीचा लाभ घ्यायचा असतो तेव्हा सातबा-यावर तुमचे लाव असावे लागते. आजही अनेक व्यक्तींना सातबा-यावर आपले नाव कसे लावायाचे याची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीतून त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
आजोबा वारले की, त्यांची संपत्ती वडिलांकडे जाते तर वडिलांनंतर यावर मुलाचा हक्क असतो. यालाच वारसा हक्क असे म्हणतात. वारसा हक्क मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे वाडिल मृत पावल्यावर पुढील तीन महिन्यांच्या आत वारसा हक्काची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी गावाकडील ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालीका, महानगरपालिका अशा ठिकाणी केली जाते.
वारसा हक्काची नोंदणी करताना त्या व्याक्तीचा मृत्यू दाखला सादर करावा लागतो. तसेच घरात असलेल्या इतर वारसदारांचे विचार देखील घेतले जातात. तसेच जमिनीच्या सर्व कागदपत्रांसह अन्य काही कागदपत्रे देखील सादर करावी लागतात. वारसा हक्काच्या अर्जासाठी देण्यात येणा-या फॉर्मवर सर्व कागदपत्रांची यादी लिहिलेली असले.
नंतर वारसा ठराव मंजूर करत त्याची नोंद होते. यावेळी सर्व वारसदारांना नोटीस बजावली जाते. तसेच १५ दिवसांत कायदेशीर आदेश काढला जातो. यात मृत्यू प्रमाणपत्र आणि तलाठी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
यात रेशन कार्ड, विहित नमुन्यातील कोर्टाचा फी स्टॅम्प, शपथपत्र, नॉमिनी, वारसा हक्क प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र आहेत. बॅंक, विमा अशा ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधीच नॉमिनी दिला असेल तर ती रक्कम सदर नॉमिनीला मिळते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.