
Bharat Rasayan Share Price Today | ‘भारत रसायन’ या कृषी रसायन उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 47000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात ‘भारत रसायन’ कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवरून वाढून 9000 रुपयांवर पोहचले आहेत. (Bharat Rasayan Limited)
‘भारत रसायन’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 14,315 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 8280 रुपये होती. गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 9,744.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 एप्रिल 2003 रोजी ‘भारत रसायन’ कंपनीचे शेअर्स 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या काळात भारत रसायन कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 कोटी रुपये झाले आहे. आज 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9744.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कृषी रसायन उत्पादन करणाऱ्या ‘भारत रसायन’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 47491 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 2 एप्रिल 2003 रोजी ‘भारत रसायन’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.71 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षात 8700 टक्के परतावा :
‘भारत रसायन’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8710 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 3 मे 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 111 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 एप्रिल 2023 रोजी भारत रसायन कंपनीचे शेअर्स 9780 रुपयेवर पोहचले होते. जर तुम्ही 3 मे 2013 रोजी म्हणजेच 10 वर्षांपूर्वी भारत रसायन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 88.10 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.