
Credit Card | आजच्या काळात क्रेडिकरण्याच वापरणे फार सोपे झाले आहे. आज काल तर लोकांना क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचीही गरज पडत नाही. आता तर तुम्ही क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. परंतु कार्ड जेर हरवले तर ते बंद करण्याचे ज्ञान फार कमी लोकांना आहे.
आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले तर कंपन्यांना क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या विनंतीवर त्वरित कारवाई करणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा ग्राहकांची संख्या कमी होऊ नये म्हणून कारवाई कारणे टाळतात. कंपन्यांच्या क्रेडिट कार्ड वितरणातही हेराफेरी म्हणून कंपन्या क्रेडिट कार्ड बंद करत नाहीत.
क्रेडिट कार्ड बंद करण्याबाबत माहिती
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर क्रेडिट कार्डे बंद करू नका, असे आवाहन अनेकदा बँकां लोकांना करतात. मात्र हे चूक आहे. जर ग्राहक बँकेला क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती करत असेल तर बँकेचे ग्राहक सेवा अधिकारी त्या ग्राहकाला कार्ड बंद न करण्याची विनंती करतात, कारण त्यांचे ग्राहक कमी होतात. कंपनी त्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवत राहतात आणि ग्राहक तुटून जाऊ नये म्हणून आकर्षक ऑफर देतात. कंपन्या ग्राहक कार्ड बंद करू नये म्हणून सर्व प्रयत्न करतात. अनेकदा असे घडते की ग्राहक नाईलाजाने होकार देतात.
जर एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड बंद करण्यावर ठाम आणि विचार बदलत नसेल तर त्याला निश्चितपणे 2-3 वेळा आणखी कॉल केले जातात, आणि कारण विचारले जाते. बँकां त्यांचे क्रेडिट कार्ड ग्राहक कमी होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न करतात आणि कार्ड बंद करू देत नाहीत. ग्राहकांची संख्या कमी झाली तर बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
आरबीआयचे नियम
क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी आरबीआयने काही नियम तयार केले होते. नियमांनुसार, क्रेडिट कार्ड कंपन्यांना क्रेडिट कार्ड बंद करण्याची कोणतीही विनंती स्वीकारने बंधनकारक आहे. ग्राहकाची कोणतीही थकबाकी नसेल तर 7 दिवसांच्या आत क्रेडिट कार्ड बंद झाले पाहिजे. नियमानुसार, कंपन्यांनी ग्राहकांचे कार्ड बंद करण्याच्या विनंतीवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु क्रेडिट कार्ड कंपन्या तसे करताना दिसत नाही. कंपन्या क्रेडिट कार्ड ग्राहकांनी कार्ड चालू ठेवावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
नियम संक्षिप्त
RBI च्या नियमानुसार, क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी जेव्हा ग्राहक विनंती करतो, तेव्हा क्रेडिट कार्ड कंपन्यांनी कार्डधारकांना काही पर्याय देणे गरजेचे आहे. कार्ड धारकांना कार्ड बंद झाल्याची माहिती ईमेल किंवा एसएमएसद्वारे देणे आवश्यक आहे. बँक ग्राहकांना पोस्टद्वारे कार्ड बंद करण्याचा अर्ज पाठवावा अशी सक्ती करू शकत नाही. बँकांनी कार्ड बंद करण्याची प्रक्रिया अत्यंत सहजपणे पार पाडावी.
RBI ची सक्ती
RBI च्या नियमांनुसार क्रेडिट कार्ड कंपनीने सात दिवसांच्या आत ग्राहकाची क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती पूर्ण करणे बंधनकारक आहे. बँकांना 7 दिवसांत संपूर्ण प्रक्रिया करावीच लागते. कार्ड बंद करण्याची अट अगदी सोपी आणि साधी आहे, की क्रेडिट कार्ड ग्राहकाच्या क्रेडिट कार्डावर कोणतीही थकबाकी नसावी.असे न केल्यास तुम्ही पुन्हा बँकेशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही RBI कडे तक्रार करू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.