
Govt Employees Gratuity & Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, असा निर्णय सरकारने घेतला आहे. खरं तर ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसंदर्भातील नियमसरकारने बदलले आहेत. यामध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सरकारच्या या इशाऱ्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका त्यांना बसू शकतो.
केंद्र सरकारने महत्वाचे आदेश दिले
नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्याचा महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सरकारकडून एक निर्देशही जारी करण्यात आला होता, ज्यात कर्मचाऱ्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. यानुसार, जर एखादा कर्मचारी कामाच्या ठिकाणी गैरवर्तन करताना आढळला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, त्याअंतर्गत त्याचे पेन्शन आणि ग्रॅच्युइटी बंद केली जाऊ शकते. अशा वेळी नियम काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पालन करा.
नोटीस बजावली
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये सरकारने यासंदर्भात नोटीस बजावली होती. यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला होता की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कामात हलगर्जीपणा केला तर निवृत्तीनंतर त्याच्या अडचणी वाढू शकतात.
नव्या तरतुदींची भर
केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 2021 अंतर्गत सरकारने ही नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, जर एखादा केंद्रीय कर्मचारी नोकरीदरम्यान कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा करताना आढळला तर निवृत्तीनंतर त्याची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन बंद केली जाईल. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
या परिस्थितीतही हा नियम लागू राहणार
* सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याची पुन्हा कंत्राटावर नियुक्ती करण्यात आली असेल.
* निवृत्त कर्मचाऱ्याने पेन्शन किंवा ग्रॅच्युईटी घेतली असेल, त्यानंतर तो दोषी आढळला असेल तर त्याच्याकडून पूर्ण किंवा अंशत: रक्कम परत घेतली जाईल.
यूपीएससीकडून सूचना घ्याव्या लागतील
नियमानुसार, अशा परिस्थितीत कोणत्याही प्राधिकरणाला अंतिम आदेश देण्यापूर्वी संघ लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) सूचना घ्याव्या लागतील. त्याचबरोबर ज्या परिस्थितीत पेन्शन रोखली जाईल किंवा काढली जाईल, अशा परिस्थितीत किमान रक्कम दरमहा 9000 रुपये असावी.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.