Vegetable Markets | आधीचे बुरे दिन बरे होते? अच्छे दिनच्या नादात रोजच्या भाज्या आणि चिकनचे दर सारखेच झाले, महागाई शिगेला पोहोचली

Inflation Effect | मागील १० वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात रोज लागणारा भाजीपाला सुद्धा परवडत नाही अशी स्थिती झाली आहे. मिळकत वाढेना आणि महागाई नियंत्रीत होईना अशा दुहेरी कात्रीत सामान्य लोकं अडकली आहेत. २०२४ मध्ये ‘अच्छे दिन आणे वाले है’ असे नारे देत आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचे वचन देतं पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आता लोकांना ‘बजरंगबली की जय बोलून मतदान करा’ असं भर सभेतून सांगताना महागाईवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत. त्यात आता इतर नैसर्गिक परिणामांमुळे महागाई अजून वाढली आहे.

वाढत्या तापमानामुळे भाज्यांचे दर वाढत आहेत. यामुळे गृहिणींच्या घराचे बजेट बिघडत आहे. पावसानंतर भाज्यांचे दर आणखी वाढतील, असे मानले जात आहे. सध्या बाजारात भोपळा, लौकी, तोरीचा हंगाम सुरू झाल्यानंतरही या भाज्यांच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी टोमॅटो वीस रुपयांना विकला जात होता, पण आज तो तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची चिंताही वाढू लागली आहे. काही दिवसांपासून बटाट्याचे दर ठीक होते, पण आता बटाट्याचा भाव वीस रुपयांवर पोहोचल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. बाजारात भोपळ्यासह सर्वच दैनंदिन भाजपचे दर वाढले आहेत.

त्यात मान्सूनने उशीर केल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आणि त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचं संकट आलेलं आहे. एकूणच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. नागपुरात तर भाजीपाल्याची किंमत दुप्पटीने वाढली आहे. काही भाज्यांचे आणि मासे-चिकनचे दर जवळपास सारखेच झाले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहेत.

नागपुरात भाज्यांच्या दरात दुप्पटीनं वाढ झाली आहे. नागपूरच्या भाजी मार्केटमध्ये सध्या फरसबी 320 किलो रुपयाने विकली जात आहे. सिमला मिर्ची 160 रुपये किलो झाली आहे. किरकोळ बाजारात वांगी 80 रुपये, मेथी 160 रुपये, गवार शेंगा 120 रुपये, भेंडी 80 रुपये, ढेमुस 120 रुपये आणि कोथिंबीर 160 रुपये किलोवर गेली आहे. लांबलेला पाऊस आणि वाढत्या उकाड्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची दरवाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. बाजारात आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती, भाजी विक्रेते अमित मुळेवार यांनी दिली आहे.

News Title : Inflation Effect in vegetable markets check details on 19 June 2023.