23 April 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री

Marathwada Flood

बारामती, 10 ऑक्टोबर | अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

Marathwada Flood. Out of 48 lakh hectares in Marathwada, 32 to 36 lakh hectares have been damaged due to heavy rains. If calculated as per NDRF norms, it will cost around Rs 4,000 crore to compensate :

उपमुख्यमंत्री म्हणाले, ४ पालकमंत्र्यांनी मराठवाड्याला मदतीची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीनंतर माहिती घेण्याची सूचना पुनर्वसन विभागाला दिली. निर्णय मुख्यमंत्री घेतील. खरिपात पीक कर्ज घेऊन वेळेत फेडणाऱ्यांना शून्य टक्के व्याज लावायचे, असा निर्णय घेतला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे वेळेत कर्जफेड कठीण आहे. त्यांचे पीकच राहिले नाही. दुष्काळात कर्जाचे पुनर्गठन करून पुढील कर्जासाठी पात्र ठरवतो. तो निर्णयही घेतला जाणार आहे.

केंद्राने पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर भरपाई वाटप:
मंत्री अजित पवार म्हणाले की, पीक विम्याच्या पहिला हप्त्यापोटी राज्य सरकारने ९७४ कोटी रुपये दिले आहेत. केंद्र सरकारचा हप्ता येणे बाकी आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची काल बैठक झाली. त्यात राज्य सरकारने हप्ता भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तीन दिवसांत केंद्राकडून सुमारे एक हजार कोटींचा हप्ता भरला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Marathwada Flood it will cost around Rs 4000 crore to compensate.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x