
My EPF Money | जर तुम्हीही नोकरदार ईपीएफ खातेधारक असाल तर सरकारने 1 एप्रिल 2023 पासून ईपीएफमधून पैसे काढण्याचा नियम बदलला आहे. ईपीएफओमधून पैसे काढण्याबाबत अर्थसंकल्प 2023 मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासंदर्भातील कर नियमात बदल केला आहे. आता पॅन लिंक नसेल तर पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा त्या पीएफधारकांना होणार आहे ज्यांचे पॅन अद्याप अपडेट झालेले नाही. वास्तविक, जर एखाद्या खातेदाराने 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. तर 5 वर्षांनंतर टीडीएस येत नाही.
याशिवाय अर्थसंकल्प 2023 मध्ये टीडीएससाठी किमान 10,000 रुपयांची मर्यादा ही काढून टाकण्यात आली आहे. मात्र लॉटरी, कोडीच्या बाबतीत १० हजारांच्या मर्यादेचा नियम लागू राहणार आहे. एका आर्थिक वर्षात एकूण १० हजार रुपयांपर्यंत टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल.
जाणून घ्या काय आहेत नवे नियम
ज्यांच्याकडे टॅक्स पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस द्यावा लागतो. जर एखाद्याचे पॅन कार्ड ईपीएफओ रेकॉर्डमध्ये अपडेट नसेल तर त्याला 30 टक्क्यांपर्यंत टीडीएस भरावा लागतो. आता ती २० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
टीडीएस कधी घेतला जातो?
या व्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफओ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागेल. जर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली जात असेल आणि पॅन कार्ड उपलब्ध असेल तर 10 टक्के टीडीएस आकारला जाईल, परंतु पॅन नसल्यास आता 30 टक्के टीडीएसऐवजी 20 टक्के भरावा लागेल.
ईपीएफचे पैसे कधी काढू शकतो?
ईपीएफ खात्यात जमा झालेली रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे काढता येते, याला ईपीएफ विड्रॉल असेही म्हणतात. जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो किंवा सलग 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहतो, तेव्हा ईपीएफची रक्कम काढली जाऊ शकते. त्याचबरोबर वैद्यकीय आणीबाणी, लग्न, गृहकर्जाचा भरणा अशा परिस्थितीत या फंडात जमा झालेल्या रकमेचा काही भाग काही अटींवर काढता येतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.