
Naukri Selection Point | समोरासमोरील मर्यादित संवादामुळे दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापनावरील विश्वास हा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आला आहे. अहवालानुसार, कामाच्या ठिकाणी चांगल्या सुरक्षा उपाय योजना आणि सुविधा ही सर्वात प्रेरणादायक बाब आहे जी त्यांना नियमितपणे कार्यालयात येण्यास प्रवृत्त करते.
सॅलरी :
स्वत:साठी नोकरी निवडताना लोकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पगार. एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांनी असे म्हटले आहे. याशिवाय कंपनीच्या व्यवस्थापनावरील विश्वास हादेखील यासंदर्भात महत्त्वाचा निकष बनला आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट सीबीआरई इंडियाने ‘व्हॉईस ऑफ इंडिया, भविष्यात लोक कसे राहतील, काम करतील आणि खरेदी करतील’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
किमान तीन दिवस कार्यालयात
हे सर्वेक्षण १५०० हून अधिक लोकांवर करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे ७० टक्के लोकांनी सांगितले की त्यांना किमान तीन दिवस कार्यालयात यायचे आहे. सर्व वयोगटातील ६० टक्क्यांहून अधिक संभाव्य कामगारांनी (ऑफिस आणि हायब्रीड दोन्ही) नोकरी निवडीमध्ये पगार हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.
व्यवस्थापनावरील विश्वास
त्याचबरोबर समोरासमोरील मर्यादित संवादामुळे कंपनीच्या व्यवस्थापनावरील विश्वासही दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आला आहे.
आरोग्य सर्वात महत्वाचा घटक
सीबीआरईचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका) अंशुमन मॅगझिन म्हणाले, “सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की नियमित कार्यालय भेटींचा विचार करताना, बहुतेक लोक कामाच्या ठिकाणाची गुणवत्ता आणि काम करण्यासाठी वैयक्तिक जागेवर लक्ष केंद्रित करतात, तर महामारीनंतर आरोग्य त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक बनला आहे.
हायब्रीड वर्क
हायब्रीड वर्क (कधी ऑफिसला येणे तर कधी वर्क फ्रॉम होम) भारतात मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ७८ टक्के लोक या प्रकारच्या कामांना प्राधान्य देतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.