
Saving Account | प्रत्येक व्यक्ती आपल्या सोईनुसार बॅंकेत खाती खोलत असतात. त्यामुळे एका व्याक्तीची वेगवेगळ्या बॅंकेत एका पेक्षा जास्त खाती असू शकतात. किंवा एकाच बॅंकेत विविध खाती असू शकतात. अशात असे खाते खोलताना अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती असने आवश्यक आहे. त्यामुळे या विषयी आरबीआयचे नियम काय सांगतात हे जाणून घेऊ.
अकाऊंट मेन्टेन ठेवणे आवश्यक
तुमचे सेविंग अकाऊंट मेन्टेन ठेवणे आवश्यक असेत. त्याचे आनेक फायदे आहेत. मात्र अकाउंट मेन्टेन नसेल तर मोठा फटका बसतो. यात तुमचे नुकसान होते. प्रत्येक बॅंकेचा मिनिमम बॅलेन्स ठरलेला असतो तेवढा ठेवणे बंधणकारक असते. जर तसे केले नाही तर तुमचे पैसे बॅंकेत अडकतात आणि बॅंक फाइन लावत ते पैसे तुमच्या खात्यातून कट करते.
जर बॅंकेत तुमचे एकच खाते असेल तर त्यात अडचण येत नाही. मात्र दोन खाती किंवा त्याहून जास्त असतील तर त्यांना मेनटेन ठेवणे थोडे कठीण होते. यात तुमची आर्थिक ओढातान होते. जर बॅलेन्स रक्कम कमी असेल तर फार त्रास होत नाही. मात्र ही रक्कम जास्त असेल तर खर्चाचे गणित बिघडते.
बॅंकेत खाते खोलताना तुमचे सॅलरी आणि सेविंग हे दोन्ही अकाउंट वेगळे ठेवले पाहिजेत. तसे केल्यास तुमची गैरसोय होणार नाही. तसेच तुमचे पैसे नेमके कुठे आणि कसे खर्च होत आहेत हे देखील समजेल. जर तुम्ही काही उद्देशासाठी जास्त खाती खोलत असाल तर त्याचे निट नियोजन असले पाहीजे.
आरबीआयचा नियम
प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या भारतात कितीही सेवींग अकाऊंट खोलू शकतो. यासाठी आरबीआयचा कोणता नियम अथवा निर्बंध नाही. एका व्यक्तीचे कमाल आणि किमान एवढे खाते असावे यासाठी काहीही तरतूद केलेली नाही. आरबीआयने कोणत्याही बॅंक खातेदाराला या मर्यादेत अडकवले नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.