
Waiting Ticket Rules | ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रवास करताना तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असणं खूप गरजेचं आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले. नव्या नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करताना पकडली गेली तर त्याला दंड भरावा लागणार आहे. देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. अशावेळी अनेक जण रेल्वेतून प्रवास करतात आणि रेल्वेत प्रचंड गर्दी होते. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर गर्दी पाहता रेल्वेकडून अनेक नव्या गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
तर त्याला 500 रुपयांचे चलन कापावे लागणार :
नव्या नियमानुसार प्रामुख्याने वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यास पूर्ण बंदी आहे. रेल्वेकडून तिकीट तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये दररोज चार ते सहा हजार प्रवासी वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करताना पकडले जात आहेत. आता जर एखादा प्रवासी वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करताना पकडला गेला तर त्याला 500 रुपयांचे चलन कापले जाईल.
ट्रेनमध्ये ब्लँकेट, चादरी आणि उशाची सुविधा सुरू :
एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे. त्यांना पुन्हा ट्रेनमध्ये ब्लँकेट, चादरी, उशा यासह इतर अनेक सुविधा मिळणार आहेत. पण यावेळी प्रवाशांना ही सेवा मोफत दिली जाणार नाही. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात.
आपले किट घरी नेऊ शकाल :
रेल्वे यावेळी प्रवाशांना पूर्ण किट देणार आहे. ज्याची किंमत ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. संपूर्ण किट खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. या सेवेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. प्रवासी त्यांच्या गरजेनुसार वस्तूही खरेदी करू शकतात आणि या सेवेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे आपण आपले किट घरी नेऊ शकाल.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत ब्लँकेट, चादरी, उशा पुरवण्याची सुविधा बंद करण्यात आली होती. रेल्वेकडे या सुविधेची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करत होते. आता रेल्वे लोकांना पूर्ण किट देणार आहे. ब्लँकेटसाठी १८० रुपये, उशासाठी ७० रुपये आणि चादरीसाठी ४० रुपये.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.