मुंबई : ईशान्य मुंबई’मधील लोकसभा आधीच किरीट सोमैया आणि शिवसेनेतील वादातून चर्चेत आली असताना आता स्थानिक मतदाराचा रोष देखील भाजप उमेदवाराला सहन करावा लागत आहे. भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि किरीट सोमैया घाटकोपर येथे प्रचाराला आले असता स्थानिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
मतदारसंघातील स्थानिक लोकांनी भर रस्त्यात धारेवर धरल्याने ही भाजप उमेदवारासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भाजपचा गड असलेल्या मुलुंड परिसरात देखील प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकाबाजूला भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या अपेक्षा गुजराती मतदारावर अवलंबून असताना दुसऱ्याबाजूला एनसीपीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज आणि प्रत्यक्ष गुजराती समाजाचा एक गट देखील सर्मथन देताना दिसत आहे.
तसेच स्थानिक शिवसेनेचे काही गट आणि मनसेचे कार्यकर्ते देखील संजय दीना पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या ईशान्य मुंबईतील हालचाली या राष्ट्रवादीसाठी आशादायी आहेत, तर भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे.
व्हिडिओ: काय घडलं भाजपच्या प्रचारादरम्यान नक्की?
