25 April 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

खड्डयांसोबत सेल्फी | राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर स्तुत्य उपक्रम का राबत नाही?

BJP MLA Ashish Shelar, letter to Ashok Chavan, Potholes, Mumbai Goa highway

मुंबई, ३० ऑगस्ट : गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असे प्रश्न भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी विचारले आहेत. शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना यासंदर्भात एक पत्रदेखील लिहिलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्यांमुळे भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली आहे. वेळीच ई-पास उपलब्ध करून दिले नाहीत. एसटी उपलब्ध करून दिली नाही. रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीत केली नाही. क्वारंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत सरपंच आणि कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्या वेळीच चर्चा केली नाही. सरकारच्या अशा आठमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहोचला. मात्र, चाकरमान्यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीस आणला.

मुंबई-गोवा महामार्ग पनवेल पासून चिपळूनपर्यंत पूर्णपणे उखडून गेला आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यांवर डांबर शिल्लक राहिलेलं नाही. मार्गावर सर्वत्र खड्डे, खडी अवस्था आहे. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षाही या महामार्गाची दयनिय अवस्था झाली आहे.

दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजवण्यात येतात. मात्र, यंदा राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्याना कंबरेचे आजार होतील की काय? अशी भीती वाटत आहे. कोकणच्या रस्त्याकडे सरकारने दुर्लक्षाबद्दल तसेच कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल निषेध करतो. किमान आता तरी सरकारने खड्डे बुजवावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

 

News English Summary: NCP, which took selfies with potholes last year, is not doing this commendable project on Mumbai-Goa highway this year. Why are our servants going to Konkan persecuted so much this year? Why doesn’t the entire highway look miserable? Why does the Konkani man put up with endurance? Such questions have been asked by BJP MLA and former minister Ashish Shelar.

News English Title: BJP MLA Ashish Shelar letter to Ashok Chavan regarding potholes on Mumbai Goa highway News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x