मुंबई: फडणवीस सरकारने दडपशाही मार्गाने आरे’तील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर धडाडीने निर्णय घेण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नाही, असे सांगतानाच ठाकरे यांनी येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडऴ विस्तार करणार असल्याचे सांगितले. तसेच मी आणि सहा मंत्री एकत्र बसून निर्णय घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होती. आता आम्ही मोकळे झालेलो आहोत.

फडणवीस सरकारने दडपशाही करून गुन्हे लादले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे घेतले