27 July 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

नाशिक ते मुंबई किसान सभेचा विराट मोर्चा, सरकारच्या निषेधार्थ

नाशिक : भाजप – शिवसेना सरकारने दिलेले कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई किसान सभेने सरकारविरोधात विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.

किसान सभेच्या नैत्रुत्वात नाशिक ते मुंबई असा विराट किसान मोर्चाचा लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. सध्या महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये सुरु आहे. त्यामुळे विराट किसान मोर्चा १२ तारखेला विधिमंडळावर धडक देणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विराट किसान मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत.

आधीच अपुरा पाऊस नंतर गारपीट आणि अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्यात सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली फसवी धोरणे आणि फसवी कर्जमाफी त्यामुळेच भाजप – शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी आणि विविध मागण्या मान्यकरून घेण्यासाठी हा विराट किसान मोर्चा मुंबई मध्ये विधिमंडळावर लवकरच धडक देणार आहे. खरंतर भाजप – शिवसेना सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे त्यामुळेच बळीराजाने या विराट मोर्चाचे हत्यार उपसले आहे.

किसान मोर्चा ‘विराट’ धडक !

काय आहेत किसान सभेच्या मागण्या ?

१. वन अधिकार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे
२. शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती
३. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव मान्य करावा
४. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी
५. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून संपूर्ण महाराष्ट्रातील शेती समृद्ध करावी

हॅशटॅग्स

#Kissan Morcha(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x