29 March 2024 7:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

अजित पवार चुकले! ती कविता हरिवंशराय बच्चन यांची नव्हे तर...

Story Bollywood Superstar Amitabh Bachchan, correction, Finance Minister Ajit Pawar, Maharashtra Budget 2020 speech

मुंबई: शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्प भाषण करताना अजित पवारांनी कविता सादर केली होती. त्यांच्या कवितांना आमदारांकडून दाद मिळाली. पण असं करत असताना अजित पवारांकडून एक मोठी चूक झाली. अजित पवार यांच्या पहिल्या अर्थसंकल्पी भाषणाबद्दल सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी बाकांवरही प्रचंड उत्सुकता होती. विधिमंडळात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी,

‘असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,

क्या कमी रह गई, देखो और सुधार करो’

पवार यांनी सांगतिलं की ही कविता हरिवंशराय बच्चन यांची आहे. या कवितेबाबत सर्वसामान्यांचीही अशी समजूत आहे कि ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही कविता हरिवंशराय बच्चन यांनीच लिहिली होती. मात्र सत्य काही वेगळंच आहे. ही सुप्रसिद्ध कविता हरिवंशराय बच्चन यांनी नाही तर कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनीच त्याची आठवण करून दिली आहे.

 

News English Summery: Maharashtra Finance Minister Ajit Pawar presented the first budget of the Thackeray government on Friday 06 March. Speaking on the budget, Ajit Pawar presented the poem. His poems received praise from the MLAs. But while doing so, Ajit Pawar made a big mistake. Ajit Pawar’s first Budget speech was very keen not only on the ruling but also on the opposition. After reading the budget in the legislature, Ajit Pawar said,……..’Failure is a challenge, accept, What was lacking, look and improve . While submitting such a poem, it was said that the state would have to move ahead, accepting the challenges. Later, Pawar said that this poem is from Harivansh Rai Bachchan. There is a general belief that this poem was written by Harivansh Rai Bachchan. But the truth is different. This famous poem is not written by Harivansh Rai Bachchan but by poet Sohanlal Dwivedi.

 

Web News Title: Story Bollywood Superstar Amitabh Bachchan correction Finance Minister Ajit Pawar did mistake in budget speech.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x