29 March 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं

Corona Crisis, Mumbai

मुंबई, २३ मार्च: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

देशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच करोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनंही मोठी पावलं उचलली आहेत. राज्यात ३१ मार्चपर्यंत नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तर केंद्र सरकारनंही ३१ तारखेपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता, मात्र नको असलेली आवाहन करून त्यांनीच पुन्हा वातावरण गढूळ केल्याची टीका सुरु झाली आहे.

दरम्यान, सोमवारी मात्र सर्व नियम पयदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणा-यांची संख्या वाढत आहे. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकूश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यु टर्न मारावा लागला.

 

News English Summery: Due to the increasing prevalence of corona in the state, the state government has locked down the state. In order to prevent people from crowding, mobilization orders have also been issued. Citizens of Mumbai-Pune seem to be acting recklessly as all efforts are being made by the government. People in Mumbai-Pune took to the streets as usual today. Due to this, there was heavy traffic in Mulund and Sion in Mumbai. The prevalence of coronas is increasing in the country as well as in the state. Similarly, the state government has taken big steps to prevent the risk of coronation. The state government has decided to impose section 144 in urban areas by March 31. The central government has also decided to keep the railway services in the country closed till 31st. In addition, on Sunday, Prime Minister Narendra Modi had appealed to the people’s curfew. Citizens also responded favorably to his appeal, but he has been criticized for making the atmosphere again by making unwanted appeals.

 

News English Title: Story over rush vehicles Mumbai Police closed express highway News latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x