लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी

मुंबई, २३ मार्च: कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
‘कोरोना’चा प्रसार दिवसागणिक वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत हा आकडा ८९ वर पोहोचला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. एकप्रकारे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र, सरकारच्या आदेशानंतरही लोक बिनधास्त रस्त्यावर येत आहेत.
मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
परिस्थिती गंभीर आहे ..covid positive ची संख्या 89 झाली आहे .. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत @OfficeofUT संचार बंदी हाच एकमेव उपाय आहे
परिस्थिती चा विचार करता…
अभि नही तो कभी नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 23, 2020
दरम्यान, परिस्थितीचा अंदाज आल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करताना सरकारला संचारबंदीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, कारण लोकं अजूनही कोरोना व्हायरस’बाबत गंभीर दिसत नाहीत. म्हणूनच जमावबंदी नको संचारबंदीच लागू करायला हवी. सतत नियमात बदल केल्याने सरकारी यंत्रणा व जनता पण गोंधळली आहे’ असं म्हटलं आहे.
सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, कारण लोक अजूनही #coronavirus बाबत गंभीर दिसत नाहीत.म्हणूनच जमावबंदी नको संचारबंदीच लागू करायला हवी. सतत नियमात बदल केल्याने सरकारी यंत्रणा व जनता पण गोंधळली आहे.@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @rajeshtope11
— Raju Patil (@rajupatilmanase) March 23, 2020
News English Summery: Minister Jitendra Awhad tweeted that the situation in the state was serious. The number of corona virus patients has now reached 89. However, people do not take it seriously. Jitendra Awhad said that I am experiencing this by myself. Similarly, Jitendra Awhad has urged Uddhav Thackeray that communication is the only solution in the state as people are not listening. Meanwhile, MNS MLA Raju Patil has expressed concern over the situation and demanded the government to take a decision on the ban. MLA Raju Patil has tweeted that the government should take some concrete decision as people are still not serious about the corona virus. Therefore, mobilization should not be imposed. It is said that the government system and the people are also confused by the changes in the rules.
News English Title: Story NCP Leader Jitendra Awhad and MNS MLA Raju Patil has requested CM Uddhav Thackeray impose ban communication state News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
-
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
-
Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा
-
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
-
Jonjua Overseas Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा, जोनजुआ ओव्हरसीज शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
-
Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
-
2014 मध्ये 15 लाख देण्याचं आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन देणारे मोदी सभेत म्हणाले, 'आश्वासन देऊन विसरणं ही काँग्रेसची सवय'
-
उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
-
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय
-
Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या