नाशिक : पुढील सर्व निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असून आम्ही निर्णयापासून माघार घेणार नाही असं पुन्हां एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी नाशिक दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं.

आम्हीच स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा, असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिले होते असं स्पष्ट करत जिथे जिंकू तिकडेच उमेदवार दिले आहेत.

बेळगावातील सीमा भागातील मतदारांनी कोणतीही दुही न माजविता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे असं सांगत शिवसेना तेथे आपले उमेदवार देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केलं आहे.

परंतु पत्रकारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि एकनाथ खडसेंना मिळालेली क्लीन चिट बाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपण या विषयावर कोणतेही भाष्य करणार नाही अस स्पष्ट केलं.

We will never make alliance with BJP said uddhav thakarey