मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २३१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईमधील पाणी साचण्याच्या सर्वाधिक घटना या माटुंगा, दादर, किंग्ज सर्कल आणि हिंदमाता परिसरात घडल्या आहेत. कारण हा भाग भौगोलिक दृष्ट्या सखल समजला जातो. परंतु त्यामुळे स्थानिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाणे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन पथकाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुंबईतील पावसाचा असाच कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.
