
SBI Mutual Fund | एसबीआय लार्ज अँड मिड कॅप फंड सुरू होऊन ३२ वर्षे पूर्ण झाली असून या काळात या योजनेने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने फेब्रुवारी १९९३ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून २००० रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू केली असती, तर त्यांच्या गुंतवणुकीचे फंड मूल्य आतापर्यंत १.३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते. या योजनेच्या सुरुवातीपासून एसआयपीवर १५.७ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा (सीएजीआर) देण्यात आला आहे.
चांगल्या परताव्याची मालिका
३२ वर्षांपासून सुरू आहे. एसबीआय लार्ज आणि मिड कॅप फंड २८ फेब्रुवारी १९९३ रोजी सुरू करण्यात आला आणि तेव्हापासून त्याने गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला आहे. या योजनेत सुरुवातीपासून आतापर्यंत एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी १३.३३ टक्के वार्षिक परतावा देण्यात आला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सुरुवातीला एकरकमी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आज ५४.८४ लाख रुपये झाली असती.
2000 रुपयांच्या एसआयपी वर 1.35 कोटींचा परतावा मिळाला
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसबीआय लार्ज आणि मिड कॅप फंडात लाँचिंगच्या वेळी 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर त्यांच्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य आतापर्यंत 6.75 कोटींवर पोहोचले असते, तर या कालावधीत त्यांची एकूण गुंतवणूक केवळ 36.2 लाख झाली असती.
त्याचप्रमाणे जर कोणी लाँचिंगच्या वेळी २००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर त्यांचे सध्याचे फंड मूल्य १.३५ कोटींवर पोहोचले असते, तर त्यांची एकूण गुंतवणूक ७.२४ लाखांच्या आसपास झाली असती. ही योजना सुरू झाल्यापासून एसआयपीवर वार्षिक सरासरी परतावा (सीएजीआर) सुमारे १५.७ टक्के देण्यात आला आहे.
प्रत्येक कालावधीत चांगली कामगिरी
एसबीआय लार्ज आणि मिड कॅप फंडाने वेगवेगळ्या कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने १८.४४ टक्के, १० वर्षांत १५.५७ टक्के आणि १५ वर्षांत १५.६ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा दिला आहे. त्या तुलनेत योजनेचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्स (निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय) ने ५ वर्षांत १८.३२ टक्के, १० वर्षांत १६.०४ टक्के आणि १५ वर्षांत १५.६५ टक्के परतावा दिला आहे.