15 February 2025 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

सर्जिकल स्ट्राईक वरून मतं मागणारे मोदी स्वतः स्ट्राईकसाठी गेले होते कि जवान? - शरद पवार

bjp, bjp maharashtra, surgical strike, indian army, ncp, sharad pawar, narendra modi

नागपूर: पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घर मै घूस कर मारुंगा… ‘, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः गेले होते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक वरून नरेंद्र मोदींची खिल्ली उडविली.

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारबरोबर होते आणि सर्व मतभेद बाजूला ठेवून सरकारने बोलावलेल्या बैठकीत मी स्वत: उपस्थित होतो. परंतु लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्याच्या शौर्याचं राजकीय भांडवल केलं, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, लढाई लढली सैन्याने मात्र मोदी यांनी निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि नंतरच्या एअर स्ट्राईकचं पुरेपूर भांडवल करून फायदा घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. उलट कलम 370 हटवायला कोणाचाच विरोध नव्हता, मात्र काही विरोधक ते कलम हटवताना तिथल्या लोकांना विश्वासात घ्या, संसदेच्या संयुक्त समितीकडे विषय देऊन सखोल चर्चा करा, असे म्हणत होते.

परंतु आपलं मत मांडणाऱ्या विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका केली गेली. शिवाय कलम 370 नंतर काश्मीरच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान यांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिक, कलावंत, विचारवंत लोकांना देशद्रोही ठरवले गेले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x