28 March 2023 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा SBI Credit Card | एसबीआय बँक क्रेडिट कार्डचे नियम बदलले, हे लक्षात ठेवा आणि फायद्यात राहा IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
x

अंधेरी पूल दुर्घटना: बेजवाबदार! दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत असल्याचा शिवसेना व भाजपला विसर?

मुंबई : एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. अंधेरी पूल दुर्घटनेवरून जवाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होताना दिसत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत जवाबदारी झटकत त्या पुलाच्या देखभालीची जवाबदारी रेल्वे प्रशासनावर म्हणजे रेल्वे खात सांभाळणाऱ्या भाजपवर ढकलली आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी मला महापौर काय बोलले यात जायचे नाही, पण समस्यांचं निराकरण करण्यात जास्त रस आहे असं मत व्यक्त केलं आणि सेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

वास्तविक मुंबई महापालिकेत, राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्याचा दोन्ही पक्षांना विसर पडल्याचे एकूणच घटनेनंतर आलेल्या प्रतिक्रियांमधून समजते. वास्तविक एल्फिन्स्टन ब्रिज सारख्या दुर्घटना घडून सुद्धा सरकारने काहीच बोध घेतलेला नाही. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा मोठं मोठ्या घोषणा तर केल्या होत्या, परंतु नंतर मुंबईमधील किती पुलांचे ऑडिट झाल हे मोठं रहस्य आहे.

एखादी घटना घडली की एकमेकांवर जवाबदारी ढकलून या घटनेला आम्ही जवाबदार नाही अशा अप्रत्यक्ष सूचना देणाऱ्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने यायला लागतात, हा मुंबईकरांना रोजचाच अनुभव झाला आहे. वास्तविक या दोन्ही पक्षांना तुम्ही दिल्ली ते गल्ली एकत्र सत्तेत आहात याची आठवण जनतेने करून देणे गरजेचे आहे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x