3 May 2025 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेना व विहिंप नेत्यांना श्रीरामापेक्षा राजकारणात अधिक रस: महंत नरेंद्र गिरी

अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या विषयाला अनुसरून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेना नेत्यांना आणि उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना प्रभू रामापेक्षा केवळ राजकारणात अधिक रस आहे’, अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.

सध्या उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे नेते अयोध्येत दौरे करत आहेत. परंतु, शिवसेनेच्या या दौऱ्यानिमित्त आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेना आणि शिवसनेच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, “या नेत्यांना प्रभू रामापेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (म्हणजे शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार तसेच केवळ राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत”, असा थेट आरोप केला.

विहिंप तर्फे सुद्धा २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जर हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षांचा मंदिर निर्माण करणे हा खरंच मुख्य हेतू असता, तर त्यांनी स्वतःचे जाहीर आणि स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजीत केले असते का?. या दोन्ही संघटनांच्या अशा जाहीर कार्यक्रमातून मंदिर बांधण्याचा तोडगा निघणार नाही, असा स्पष्ट दावा सुद्धा त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला. तसेच आखाड्याशी संबंधित साधू- संत शिवसेना आणि विहिंप’च्या जाहीर कार्यक्रमात अजिबात सहभागी होणार नाहीत, हे सुद्धा स्पष्ट केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या