नवी दिल्ली : लवकरच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा पूर्ण कार्यक्रम अधिकृत पणे जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने या नियोजित पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर येथे सभा घेणार असल्याचे वृत्त आहे आणि मोदींच्या त्याच जाहीर सभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतःची पूर्व नियोजित पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा खबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे? असा सवाल सुरजेवाला यांनी या ट्विट्च्या माध्यमातून केला आहे.
काय म्हटलं आहे त्या ट्विट मध्ये नक्की….” या तीन बाबींकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजमेर येथे सभा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेच्या वेळात अचानक बदल केला आहे.” निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे? असा सवाल सुरजेवाला यांनी या ट्विट्च्या माध्यमातून केला आहे.
3 Facts- Draw your own conclusions.
1. ECI announces a PC at 12.30 today to announce elction dates to the 5 states.
2. PM Modi is addressing a rally in Ajmer, Rajasthan at 1 PM today.
3. ECI suddenly changes the time of announcement and PC to 3 PM.
Independence of ECI?
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 6, 2018
