30 April 2025 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

महागाई विरोधात भारत बंद; सत्तांतर निश्चित होणार : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशात राजकीय सत्तांतर निश्चित असून विरोधकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं’, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील भाषणादरम्यान केलं आहे. पेट्रोल तसेच डिझेलच्या आणि एकूणच इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने धरणं आंदोलन सुरु केलं असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले आहेत.

सध्या इंधन दरवाढ आणि एकूणच प्रचंड वाढलेले महागाई बघता काँग्रेसने देशभर त्याविरोधात भारत बंद’चा नारा दिला असून त्याला देशभरातील २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सर्वप्रथम आज सकाळी राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राहुल गांधींनी मानससरोवरयेथून आणलेलं पवित्र जल महात्मा गांधीच्या समाधीवर अर्पण केलं. त्यानंतर राहुल गांधींनी इंधन दरवाढी विरोधात रामलिला मैदानापर्यंत मार्चला सुरुवात केली आणि भाजप विरुद्धच्या भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

त्यावेळी देशभरातील विविध पक्षांचे नेते दिल्लीत उपस्थित होते. या मार्चमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, तारिक अन्वर, राजदचे नेते मनोज झा, जेडीएसचे नेते दानिश अली, आरएलडीचे नेते जयंत चौधरी आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंहही सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या