मुंबई : महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या आडून समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप करत MIM चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सदर मराठा आरक्षणा संदर्भातील दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका अखेर मागे घेतली आहे. तसेच, महाराष्ट्र मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल मूळ याचिकाकर्ते तसेच विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

following petition filed at bombay high court mla imtiaz jalil against maratha reservation